Saturday, July 11, 2026

सारे सोपविले हरीवरी

जागेपणी झोपलो
झोपेतही जागलो  

ब्रह्मानंदी टाळी लागली आत्मानंदी टाळी लागली

उठता बैसता आळविला श्री हरी
स्वप्नातही दिसे तो श्री हरी 

हरी संगे नित्य रमावे त्यासी मग नित्य भजावे 

नित्यनेमे त्यासी जपावे
नियमामध्ये खंड पडलासे 

ते मी सारे सोपविले हरीवरी 
हरीच करतो आता माझ्यासाठी जप

विश्रांती

अपघातानंतर देहाला मिळाली ती विश्रांती
मनास मात्र क्षणभर नाही ती विश्रांती

इकडून तिकडे विहरे याची त्याची भ्रांती
येई त्यासी मग परब्रह्माची प्रचिती

शब्दामागूनी शब्द सुचती ते आपोआप 
रचना होईल मग नवी ती ही आपोआप

विचारांच्या ओघांना नाही कसले बंधन
वाहती वाहती ते सर्वत्र बेधुंद

जरी घातले त्यांसी शब्दांचे  मग बांध
उसळुनी वाहती फोडून मग ते बांध 

अंथरूणास लावली ती पाठ
डोळे छतासी लागले उघडे सताड

मग दिसू लागते ते छतापल्याडचे ब्रह्मांड
डोळ्यामध्ये मावेना ते अखिल ब्रह्मांड

देह मनाची जाणीव नेणीव हरपता
कळेना मी कोठे ब्रह्मांडी की खाटेवरती

अंतरीची ज्योत

माझ्या अंतरंगात तेवत होती एक दिव्याची ज्योत
मंद मंद सगळीकडे पसरला होता प्रकाश

कधी कधी होत होती दिसेनासी ज्योत
अंतरंगातला अंधकार दाटला होता चौफेर

बाह्य आवकाशात होता पसरला प्रकाश
त्या प्रकाशात मग मंदमंद तेवत होती ज्योत

बाह्य आवकाशात जेव्हा पडेल गडद अंधार 
तेव्हाच तेवेल खरी अंतरंगातली ज्योत प्रखर

जसे घराबाहेर येता अंधारून प्रकाशते घर
तसेच बाह्य मनात येता अंधारून प्रकाशात अंतरीची ज्योत

कधी कुणी ऐकला आहे स्वतःच्या हृदयाचा आवाज

कधी कुणी ऐकला आहे स्वतःच्या हृदयाचा आवाज 
पाहिले आहे का रक्तवाहीन्यात खळखळणारे रक्त 

दुसऱ्याच्या हृदयाचे ऐकताना ठोके
चुकलेत का कधी तुमच्या हृदयाचे ठोके 

अंतरंगात नेहमी इतरांच्या डोकावताना 
स्वअंतरंगात डोकावलात का हो कधी

पहा कधी ऐकून आपल्या हृदयाची धडधड
ऐका कधी वाहणाऱ्या रक्ताची रक्ताची खळखळ

विसरायला होईल सारे काही बाह्य ब्रह्मांड
अंतरंगात दिसून येईल विशाल ब्रह्मांड

माऊली म्हणती हरी पाहिला रे हरी पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी

दिसेल मग तुम्हा जळी स्थळी हरी
प्रगटेल आत्माराम तुमच्या अंतरंगी

दुःख

दुःख या गोष्टीचं नाहीये की मी पडलो
दुःख या गोष्टीचं आहे की का पडलो 

मला असह्य वेदना होताहेत शारिरीक
पण त्याहून अधिक मानसिक वेदना होताहेत

माझ्या पाऊलांवर मला दोन पावलं चालता येत नाही
धड दोन पायांवर आधाराशिवाय उभं राहता येत नाही

माझे दुःख मलाच सहन करायचे आहे
पण त्यामुळे इतरांना दुःख सहन करावे लागत आहे 

माझ्या सेवेसाठी अपला अमूल्य वेळ घालवावा लागतो आहे 
इतरांच्या सेवेसाठीचा माझा वेळ मात्र वाया जातो आहे 

दुःख या गोष्टीचं नाहीये मला कोणाची सेवा करावी लागते 
दुःख या गोष्टीचं आहे माझी सेवा दुसऱ्या कोणाला करावी लागत आहे .

दिनानाथा करी मजवर कृपा

नीजआकाशी गेला जो हा देह
निमीर्षाधात आला धरेवर तो देह

स्वतःस म्हणविला मीच माझा करताकरविता
त्या देहाचा साक्षेप मग सहजी निमाला 

वेदेनेचा कलौळ साऱ्या देहासी जाहला 
उठता बैसता निजता तो देहासी जाहला

आता हा वेदनेचा कलौळ देहातीत जाहला
मी तू पणाची नेणिव क्षणी निमाली

आता वेदेनेसी त्रयस्थपणे आपण पाहवे
साहणे न साहणे ते देहातीत व्हावे

आता तुच द्यावी इतुकी दिनानाथा पीडा
जी तुजलागी होईल सहन तितुकीच पीडा 

तुझे माझे न आता उरले काही
एकाएकी ते एकरूप जाहले देहात्म्याचे

माझी पीडा तुझी जाहली साहली जर तुजला तु सहावी

सुनील म्हणे दिनानाथा करी मजवर कृपा
विसर न पडू द्यावा तव चरणरजांचा

पानावरचे कोरलेले लिखित

आयुष्यातील प्रत्येक पानावर कोरलेली असते एक न पुसणारी रेषा कितीही घासली तरी न मिटणारी

पानांमागून उलटता पाने दिसातात आपल्याला कोरी
मनासारखे घडतां मला वाटते मीच केले कोऱ्यावर काळे

पण जेव्हा घडते सारे विपरीतच 
तेव्हा कळते पानावरचे कोरलेले लिखित

मी आणि माझे मग सारेच वाटू लागते व्यर्थ
यत्न सारे आपले मग न ठरतात सार्थ
…सुनील

हरीभक्त सुनील

रिकाम्या मना रिकामे न रहावे 
दिसामाजी हरी चिंतित जावे 

शब्दामागून शब्द उमटावा हरी चित्तात वसावा 
मग कसली चिंता कसली आशा

कधी न यावी मनी निराशा
हरीवरी विसंबता करील तोच माझी चिंता 

हरी माझा मी हरीचा
हरीच लाविल पार मज पैलतीरा
…हरीभक्त सुनील

थबकली जणू ती निमिषार्धात

डॉ. रणजीत सर,

चाललो मी जी पाऊले आजवर
थबकली जणू ती निमिषार्धात

सोपविला तुम्हावर हा देह
करुनी चिरफाड दूर करा विघाड 

आहे तुम्हावरी विश्वास
कराल तुम्ही सायास 

कराल उभे मजला माझ्या पायावर
म्हणोनी ठेवला तुम्हावर विश्वास

मनसे मन की बॉंते…

मनसे मन की बॉंते…

मन को मनसे कुछ कहना था
मन मनही मन कुछ कह गया

पर इस मनका उस मनने कुछ न सुना
मन की बॉंते मनही मनमें रह गयी

किसीको अगर सुनाई दे मन की बॉंते
तो मत रखना मनही मनमें

कह देना जो सुना अनसुना मनसे मन की बॉंते अपने मनमें कुछ न रखना

… मनसे मनकी सुननेवाला सुनील

ब्रेक

कधी कधी घ्यावासा वाटतो आम्हाला ब्रेक 
रोजच्या त्याच त्याच रूटीनमधून ब्रेक

कधी कधी एखाद नाटक सिनेमा
तर कधी कधी भेट एखाद्या हॉटेलला 

देवा तुला घ्यावासा वाटत नाही का रे ब्रेक
भक्तांच्या तक्रारी त्याच त्याच 

देवा तुला येत नाही का रे कंटाळा
त्याच त्याच भक्तीच्या माळा

घेतोस की रे तुही ब्रेक कल्पांता अंती
तुझ्या अनंत लीला थांबवतोस काही काळासाठी

सृष्टीची करतोस तु पुन्हा पुन्हा रचना
खेळ तुझा तुझ्या आनंदासाठी 

आवरून घेतोस रचना साऱ्या सृष्टीची
घेतोस की रे तुही ब्रेक कधी कधी

…तुझा भक्त सुनील

नका करू कोणाचा इतुका द्वेष

नका करू कोणाचा इतुका द्वेष
कि होईल स्वतःच्या मनाला क्लेश

राग लोभ मोह मदमत्सर दूर ठेवा
मिळेल मग तुम्हासी प्रेमाचा मेवा

विद्वेष दूजांचा सर्वथा व्यर्थ
कळेल ना तुम्हा प्रेमाचा अर्थ

अर्थाचाही मग होईल अनर्थ
यत्न तुमचे सारे वर्चस्वाचे होतील व्यर्थ 

नका करू कोणाचा इतुका द्वेष
होताल मग साऱ्यांच्या प्रेमाला पारखे

सुवर्ण महोत्सवी वास्तु म्हणे तथास्तु

बापू , बघता बघता तुम्ही बांधलेल्या या ‘वास्तु’स पन्नास वर्षे झाली. आयुष्याची महत्वाची वर्षे या वास्तुत कशी गेली ते कळलचं नाही. समाधानाने आणि आनंदाने भरलेली.

हि वास्तु बांधण्याआधी श्री मधुसूदन महाराजांनी तुम्हाला विचारले होते,’काय बापूसाहेब घर बांधताय?’ तुम्ही म्हणालात की,’महाराज पैसे कुठेत घर बांधायला’  तेव्हा मधुसूदन महाराजांनी सांगितले की या वसंतपंचमीला भूमीपुजन करा आम्ही येऊ. आणि घर बांधून झाल्यावर ते स्वतः या वास्तुत येऊन गेले. अशी अनेक सत्पुरूषांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली हि वास्तु नेहमीच चैतन्यमय राहिली. 
परवा माझी साठीशांत या वास्तुतच झाली. आणि आठवले ते कित्येकांची साठीशांत, सहस्रचंद्र दर्शनाचे कार्यक्रम याच वास्तुत पार पडले. साखरपुडे, मंगळागौरी अशी कित्येक शुभ कार्ये या वास्तुत पार पडली. 

जो जे वांछिल। तो ते लाहो । प्राणिजात ।। असं पसायदान माउलींनी जगासाठी मागितलं, पण हे पसायदान प्रत्यक्ष जगले ते म्हणजे आमचे वडिल श्री. श्रीधर नारायण अगरखेडकर हे. प्रत्येकाच्या भल्याचा विचार करणारे.  दारी आलेल्या पांथस्थालाही दोन घास खाऊ घालणारे. कोथरूडच्या चाळीतील एक खोली, धनवट पाटील चाळीतील दोन खोल्या असोत व लक्ष्मी-नारायणमधील चार खोल्या असोत. साऱ्या कशा माणसांनी कायम भरलेल्या. त्यांच्याकडे आलेला प्रत्येक जण सुखासमाधानाने भरून पावलेला. 

३० मे १९५५ ला जेव्हा उभयतांचं लग्न झालं तेव्हा बापूंना नोकरी नव्हती. पण ऐन लग्नाच्या दिवशी अगदी मांडवातच इंटरव्हयूचा कॉल आला आणि सोलापूरला 'लक्ष्मीविष्णु मील' मध्ये पहिली नोकरी लागली आणि आमची आई म्हणजे खऱ्या अर्थाने लक्ष्मीच्या पावलाने उंबरठा ओलांडून आली. आणि लक्ष्मी आमच्या घरी स्थिरावली ती कायमची. नंतर पुण्यांत किर्लोस्कर ऑइल इंजिनला नोकरी लागल्यावर काही वर्षे मोठ्या भावाकडे एकत्र संसार केला. नंतर एरंडवणा गावठाणांत धनवट पाटील चाळीत स्वतंत्र चूल मांडली.  आणि आमची आई जीवावरच्या मोठ्या दुखण्यातून वाचली. पुढे पटवर्धन बागेत बंगला बांधला तो सर्व अगरखेडकर कुटुंबीयांमध्ये सर्वांत प्रथम. त्या चार खोल्यांमधील दोन खोल्या धाकट्या भावास अन भाच्यास व्यवसायासाठी दिल्या. तिथे त्यांचा व्यवसाय सुरु झाला आणि नावारूपाला आला. 

याच घरात आम्हां भावंडांचं शिक्षण नोकरी, व्यवसाय लग्न इ. पार पडलं. या वास्तूने अनेक शुभ प्रसंग साजरे केले. अगदी साखरपुडे, मंगळागौरी, डोहाळजेवण ते साठीशांती आणि सहस्रचंद्र दर्शन. इथेच भाऊ महाराज देशपांडेंचा भागवत सप्ताहही पार पडला. 

हे घर तर आमचा अभिमान आहे. या घरात सारं बालपण गेलं आणि आता शेवटचा श्र्वासही या वास्तुतच जाईल हे नक्की. 

शुभम् वास्तु

‘लक्ष्मी-नारायण’ कृपेने झालासे आज
‘लक्ष्मी-नारायण’ वास्तुस वर्षे पन्नास

या वास्तुने दिधलासे अनेका विसावा
उदरनिर्वाहाचा दिधला आसरा

येथेच जाहले अनेकांचे कार्य मंगल
येथेच केला बालगोपाळांनी दंगा

या वास्तुत घ्यावा शेवटचा श्वास
हिच त्या ‘लक्ष्मी-नारायण’चरणी प्रार्थना

माझा परिचय

मी कोण म्हणून काय पूसता
पूसा या वास्तुस माझा परिचय काय असे

या अंगणीच्या आम्रवृक्षास विचारा माझे नाम
सांगेल तो तुम्हा सळसळवून आपले प्रत्येक पान

या वास्तुच्या परसदारी असती नारळीपोफळी
त्या तरूंच्या बसून टोकावर करतील खारुताई माझ्याच नावाचा जागर

या वास्तुच्या हवेत विरघळलासे माझा श्र्वास
जर कधी न राहिला माझा श्र्वास
तरी राहिल येथे माझा आत्मा करून कायमचा वास
… सुनील 

अंगणी लावला आहे जो तुम्ही पारिजात
सुगंध तयाचा आहे अजून दरवळत

अंगणी लावला आहे जो तुम्ही आम्रवृक्ष
तयाचा झाला आहे आता वटवृक्ष

परसदारी लाविले जे नारळी पोफळी
श्रींच्या पूजनी येई कामी घरोघरी

ऐसी बांधली जी श्रीवास्तु तुम्ही
देई सर्वांसी ती आनंदाची पर्वणी

येथे नित्य जमलासे आप्तांचा मेळा
येथे नित्य होतसे बालगोपाळांचा खेळा

तुमच्याविणा आता ही वास्तु वाटतसे सुनी सुनी
तुमच्या आठवांचा येतसे उमाळा माझिया मनी

आठवण्यासाठी आधी विसरले तर पाहिजे
विसरण्यासाठी आधी आठवले तर पाहिजे

तुमच्या आठवात गुंग ते तुमचे लेकरू
….सुनील

ति. बापू…..
तुमच्या हातचा सकाळचा वाफाळलेला चहा  आता मिळत नाही. पण असं वाटतं तुम्ही हाक मारालं सुनील सहा वाजले ऊठ, दूपारच्या १२.३० च्या ठोक्याला आत्ता हाक येईल  वाढलयं  सुनील जेवायला ये. दूपारच्या साजेतीनच्या चहालाही तसेचं. रात्री स्वामी समर्थ संपायच्या आत जेवणाची घाई सुरू होतं होती. आता रात्री जेवायची इच्छाच होत नाही. 

सकाळी ऊठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्याशिवाय दिवस जात नाही. सकाळ/संध्याकाळ विष्णु सहस्रनाम आणि नरसिंह सहस्रनाम कानांवर पडत होतं आणि नकळत आमच्याकडूनही म्हटलं जात होतं. आता त्यात खंड पडला . आमच्या नकळत आमच्या दिनचर्येला एक शिस्त लागली होती. प्रत्यक गोष्ट नित्यनियमाने आणि सातत्याने वेळच्या वेळी होत होती.

तुम्ही नोकरीत असतानांही जेव्हा चाळीत रहात होतो तेव्हाही ऑफिसला जाण्या-येण्याची एक निश्र्चित वेळ होती. चाळकरिही नेहमी म्हणायचे बापू आले म्हणजे सायंकाळचे पाच वाजले घड्याळ लावून घ्या. 

तुमच्या येण्याची आणि चहा पिऊन झाल्यावर तुमच्याकडून गोष्टी ऐकण्याची नित्य सवय आमच्याबरोबर चाळीतल्या सर्व मुलांनाही लागली होती. आमचे वाढदिवस साजरे केलेत . मटकीची ऊसळ अन् ब्रेड अन् फ्रुटसॅलेट करणे हे फक्त तुम्हालाच जमायचं. आम्हा मुलांना न मागताच सारं काही मिळायचे. तुम्ही मुंबईवरून आणलेलं हार्मोनियम आणि खेळण्यातली रेल्वे अगदी बंगल्यात राहिल्यावर आल्यावर सुद्धा तशीच होती. तुम्ही आणलेली रांगणारी बाळंही अगदी पकादादाची पल्लवीला सुद्धा खेळायला मिळाली.

तुम्ही आणलेली टरबूज-खरबूज अन् शेकड्यांनी खाल्लेले आंबे यांची चव अजुनही जीभेवर रेंगाळत आहे.  या वास्तुतलाही तुमची आठवण नेहमीच येत राहील

बापूंच्या वास्तुत राहणारा लाडका मुलगा 
..... सुनील

वास्तु म्हणे तथास्तु

9 December 1975 to 9 December 2025 50 years

वैकुंठवासी श्रीकृष्णस्तु भगवान स्वयं

हे निर्गुण निराकार दिसे मज अंधकार 
हे करुणानिधान न दिसे मज तव रुप

असशी जरी तू निर्गुण निराकार 
निजभक्तासाठी होसी सगुण साकार 

दिसेना मज तव चर्तुभुज स्वरूप
शंख चक्र गदा पद्म धरिलीसे चर्तुहस्त

न दिसे तव गळा तुलसीमाळ कपाळी केशरी गंध 
का रूसलासी मजवर हे दिनानाथ 

वक्षस्थले नाना चिन्हे नसेलासे कासे पितांबर 
दिसेना दिनानाथा मज तव चरण

कृपाकरी या भक्तावर दूर करी अंधकार
देई मज चर्तुभूज स्वरूप दर्शन

दुर करी अंधकार मम चित्ताचा
प्रकाशित करी तेथे तव सगुणसाकार रूप

धन्य धन्य होईल मग हा सुनिल तव भक्त
वैकुंठवासी श्रीकृष्णस्तु भगवान स्वयं

माऊलीचे वचन

आणि जेणें जेणें वेळें । घडती कर्में सकळें ।
तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय ॥ १२८ ॥
वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं ।

माऊलीचे वचन ऐकले आम्ही तत्काळ
तैसेचे आम्ही त्यजिले कर्म फळास

ऐकले जे जे सत्संगी ते ते
त्यजिले तत्काळ
ना ठेविले साठविले मनामाजी

किंबहुना या काने ऐकले त्या कानी तजिले 
अंगी  लावण्याचे व्यर्थ न केले सायास

जे जे आपण सांगितले आणले आचरणात 
कैसे गेले दिन जांभया देण्यात
न कळले
खाता प्रसाद तिन्ही त्रिकाळ

जैसे ओततां खडकी पाणी
कोरडाच राही न झिरपे पाणी

जे जे उपदेशिले या खडका आपण
कोरडाची राहिला अंर्तबाह्य
हा खडकानंद

व्यर्थची केला आटापिटा सत्संगी येण्याचा
करुनी कृपा आम्हीवरी द्यावी माफी पामरा 

आहात जाणते महाराज तुम्ही 
काय वर्णु मी आपली महती

जे जे रचियले शब्दांचे बुडबुडे
अर्पितो महाराज आपुले चरणी

…स्वामी खडकानंद

परत निघालो आता निजधामा

पुन्हा नाही परतून येणे या धामा
परत निघालो आता निजधामा

येईल तो हरी नित मम गृही
कायासी करू मी व्यर्थ चिंता

मम हृदयी नित्य वसे तो हरी
दिधले दर्शन मजसी हृदया हृदयी एक जाहले

आता एकची मागणे त्या वैकुंठपतीस
घेऊन जावे सत्वर मज वैकुठधामी

पुन्हा नाही परतून येणे या धामा
परत निघालो आता निजधामा

प्रवासी सुनील

कधी उजेड कधी अंधार 
बाहेरच जग अनभिज्ञ

कधी झोप कधी जाग
हलते गाडी खाली वर

चालू रहाते प्रवाशांची ये जा
येता स्थानक चढ उतर

रात्रीच्या प्रवासात सारे अनभिज्ञ 
कोण आपला कोण परकं

हिच गंमत आयुष्याच्या प्रवासाचीही 
पांथस्थ क्षणभरात येतीजाती

कुणी ओळखी कुणी अनोळखी

कधी जाग कधी झोप 
चाले आयुष्य खालीवर 

साऱ्या पांथस्थांची साथ क्षणभर 
येता गंतव्य स्थान जाई उतरून

दोन क्षण सहवासाचे दोन शब्द आपुलकीचे
क्षणभराची साथ कशास हवे हेवे दावे

विसरून जावे आले गेले
उतरून जावे येता आपले गंतव्य स्थान 

…. प्रवासी सुनील

नासमझ सुनील

मुझको मै समझ सकू इतनी मेरी समझ नही
अगर मुझको आप समझ सके तो मुझको समझाना

नफरत किसीसे करनी आती नही
प्यार किसीसे जताना जमतां नही

फितरत हमारी अगर आप  जान सके तो मुझको समझाना

हमें किसीसे दुश्मनी नही, कोई हमार दोस्त नही
निभा सके यॉंरी किसीसे ये हमारी फितरत नही

अगर मुझे समझ सके तो मुझको भी समझाना

….नासमझ सुनील 

ढगांची रांगोळी

ढगांची काढली कोणी आकाशी रांगोळी 
केली कोणी उधळण सप्तरंगांची 

सूर्यकिरणांचा पसरला मोरपिसारा आभाळी
तेज आले साऱ्या धरणीस 

सरला सरला साऱ्या रातीचा तिमीर 
पसरला पसरला प्रकाश दशदिशेस

जाग्या झाल्या साऱ्या दशदिशा
उजळला सारा आसमंत

आभाळ उतरू आले

आभाळ उतरले धरेवर
क्षितिज दिसेनासे जाहले

आकाश आणि धरतीचे मिलन जणू जाहले
कुठे वसुंधरा कुठे क्षितिज कळेनासे जाहले

दूर डोंगर शिखरावर आभाळ उतरू आले
आभाळाला जणू कवेत डोंगर घेते झाले


परतताना घराकडे

धुक्याची शाल, ढगांची चादर
जणू पांघरली धरतीमातेने

अस्ताचली जाता सुर्यनारायण
सुस्तावली दिसभराच्या श्रमाने धरणीमाता

संध्यासमयी श्रांत झाली सारी सृष्टी 
परतताना घराकडे आली माझ्या दृष्टी

धुक्याची शाल, ढगांची चादर

धुक्याची शाल, ढगांची चादर
जणू पांघरली धरतीमातेने

उदयाचली येता सुर्यनारायण
उबेची आली तीस मायेची पाखर

सकाळच्या पारी जागी झाली सारी सृष्टी 
पडाता घराबाहेर आली माझ्या दृष्टी

मैने देखा कल रात को क्या आपने देखा?

अपनी अपनी आँखोंसे देखलो इक बार
कुछ देख न सकों तो केई बात नही

आकाशमें छाये काले घनेरे बॉंदल
सुरज की रोशनी करदें  आँखों को ओझल

जब बरसेंगी चंद पानींके बॅुंदे
हटेंगे काले घनेरे बॉंदल

हो जायेंगी आँखें सूरजकी रोशनीसे चकॉंचोंद 
छट जायेगा घनेरा आंधियांरा

घबरानां नही देखकर उस दिव्य तेज को 
जो आँखोंकी रोशनी को कर दे चकॉंचोंद

अब मुंदकर इकबार अपनी अपनी आँखें
झांकलो मनके अंदर अपने अपने

उस दिव्य प्रकाश को जान लो 
अपनी अपनी दिव्य आंखोंसे

वोही है निर्गुण निराकार परमात्मा 
जो है छाया हर और अंदर बाहर

जानलो उसको अपनी अपनी आँखोंसे मनकी
हो जाओगे भावविभोर दर्शनसे उसकी

मैने देखा कल रात को क्या आपने देखा?

…सदा उसे याद करनेवाले सुनील

क्यूँ हमसे बतियॉंते हो
क्यूँ हमको सताते हो

ढंगसे हमे सोने देते नही
संपनोंमे आके नींद हमार खुलवाते हो

हर क्षण हर पल साथ हमारे रहते हो
इक पल हमे अकेला छोडते न हो

हमारी तुम्हारी पहचान है जन्मोंसे
रहते हो सदा हमारे सॉंसोमें

इक पल हम सॉंस न ले
तो तुम इतना क्यूँ घबराते हो

ये सॉंसे भी तुम्हारीही आहें भरती है
अगर तुम न हो साथ मेरे हर सॉंस आखरी है

हे भगवन तुम्ही तो हरपल सताते हो
मनसे कभी ओझल होते नही

कहते हो मुझको तुम भुलाते हो
याद मेरी तुम कभी करते नही

याद उसको करते है जिसको हम भुलते है
याद तुमको क्या हम करे कभी तुम्हे भुले नही है

…सदा उसे याद करनेवाले सुनील

….लिखनेंवाले सुनील

पता नही कैसे लिखते है हम दो पंक्तीया
कहते लोग की लिखते हम कविता 

कहते है मन की बॉंते लिखते है हम
पर पता नही मनमें आती कहॉंसे ये बॉंते

लिखनेवाले हाथ होते है हमार
लेकिन लिखानेवाले कौई और

इक दिन जरूर ऐसा आयेगा
जो भी लिखेंगे वो ब्रह्मवाक्य होगा

लिखते रहे लिखते रहे लिखतेही रहेंगे
जबतक हाथ चले तबतक लिखेंगे

चाहो आप लोग पढो या न पढों
भेजते रहेंगे या दो चार कलाम

….लिखनेंवाले सुनील

धावत येई नारायण हरी

कोणासाठी येतो गळ्यामध्ये हुंदका
कोणासाठी दाटून येतो कंठ माझा

कोणासाठी डोळ्यांमध्ये होते आसवांची दाटी
कोणासाठी होते ह्रदयात कणवाची दिठी

मी करतो मीच साऱ्या होतो कारण
कळत नाही मला त्याचा कार्यकारण भाव

असे होत असेल का नेहमी त्याचे
भक्तासाठी त्याच्या कंठी असेल का हुंदका 
त्याचाही दाटून येत असेल का कंठ

होत असेल  का भक्तासाठी नारायणाच्या डोळ्यांमध्ये आसवांची दाटी
ह्रदयात त्याच्याही होत असेल का कणवाची दिठी

भक्तासाठी सोडून वैकूंठाची गादी
धावत येई नारायण हरी

देव मोठा की भक्त मोठा?

सांगा मज सांगा कोण मोठा
देव मोठा की भक्त मोठा

दिसेल कधी मज ते हरीचरण
राही क्षणभरी उभा देवाचिया द्वारी

तरी ना होई समाधान मनीचे
भेटल कधी मज तो हरी नारायण

म्हणूनची वाटे भक्तासी देव तो मोठा
नसे भक्ताच्या मनी भक्तीचा मोठेपणा

देवासाठी तोच भक्त होई मोठा
धावूनी येई सत्वर भक्तासाठी दिनानाथा

करी उभा विटेवरी पुंडलिक हरी
युगे आठ्ठावीस वाट पाहे तो हरी

हरीसाठी मोठा जिवलग तो भक्त
व्याकूळ होई तो निज भक्तासाठी

भक्त प्रह्लादासाठी घेई नरसिंह रूप
स्तंभी प्रगटलासे भक्ताकारण

हिरण्यकश्यपू वधिला उदर विदारून 
निजभक्तांसाठी धरीली नाना रूपं

जानाई घरी दळे दळण तोची
एकनाथा घरी पाणी भरी तोची

भक्तांकारण तू झालासी निर्गुणाचा सगुण
तुजसाठी असे मोठा भक्त

सांगा मज सांगा कोण मोठा
देव मोठा की भक्त मोठा


….अंतरी तुझाचा धावा करणारा सुनील

अनंतकोटी ब्रह्मांडातून फिरूनी आलो आम्ही 
लक्ष चौऱ्यांशी योनी फिरूनी आलो आम्ही

तरी न कळला पार तुझा बा अनंता
सदासर्वदा साथ असुनी तुझी अनंता

शोधीयले आम्ही व्यर्थ तुवा यत्रतत्रसर्वत्र
परी नाही दिसलासी आम्हा यत्रतत्रसर्वत्र

विसरलासे काय तु आम्हा भक्ता दिनानाथा
विसरलो आम्ही शोधावया स्वअंतरी दिनानथा

आता तरी दावशीला का वाट निजभक्ता
अंतरी माझ्या प्रकाशीत व्हावे चैतन्य तुझे दिनानाथा

….अंतरी तुझाचा धावा करणारा सुनील

….अव्यक्त सुनील

मनात असते तेच व्यक्त होते
मनातली मळमळ नव्हे तळमळ व्यक्त होते

जसे हे सारे जगत अव्यक्तातून व्यक्त होते
तसेच काहीसे मनाच्या अव्यक्त कोपऱ्यातून शब्द व्यक्त होते

कोणासाठी चार शब्द जरी बरे नाही लिहिता आले
तरी कोणाविषयी चार शब्द बुरे न लिहीले जावे

शब्द असे यावे अगदी मनाच्या खोल तळामधून
इतरांच्या काळजीने तळमळीने कळवळून

शब्दा शब्दातून व्यक्त व्हावे असे मनाला वाटते
ते कधी सुचते कधी शब्दात बांधता येते

मनाच्या गाभाऱ्यातून गुंजावे मंत्र जसे
तैसेच गुंजावे रोज शब्द नवे नवे

शब्दातीत व्यक्त होणे शब्दांचे चांदणे
मनाच्या आकाशात प्रकाशमान व्हावे चांदणे

आंधारलेल्या वाटांवर मग प्रकाश यावा तसा
जसा पुनवेच्या चांदण्यांने प्रकाशतो आसमंत जसा

….अव्यक्त सुनील

….स्वतःच्या विश्वात रमणारा सुनील

हे विश्व माझे मी या विश्वाचा
मीच घडवितो मीच संहार करतो

सारे माझ्या मनाचेच खेळ
मीच जमवतो साऱ्याचा मेळ

मीच मांडतो नव्या नव्याने डाव
मीच मोडतो पुन्हा पुन्हा डाव

या विश्वाचा रचेता अन् संहारक मी
नाही या साऱ्या कारण दुसरा कोणी

असते का हो प्रत्यकाचे आपुले विश्व
त्याचे त्याचे असते आपल्या परिधीत फिरणं

जोवरी आहे चालू श्वास माझा
तोवरीच आहे का माझे माझे विश्व 

का पुन्हा नव्याने होईल का नवे विश्व 
नव्या परिधीत होईल का नवे विश्व

….स्वतःच्या विश्वात रमणारा सुनील 

मधूरसाचे मोहळ

वेचावे शब्द न शब्द 
कोरावे लेणे शब्दबद्ध 

पेरावे शब्द न शब्द 
तैसे उगवावे शब्द न शब्द 

झरावा शब्दांतून पाझर
उचंबळावा शब्दांतून सागर

शब्द सागरांतून मेघांचा जागर
शब्दमेघांच्या गडगडातून शबदसरींचा पाझर

शब्दसरींतून वहावे कवितेचे ओहळ
शब्दांतूनीच साकारे मधूरसाचे मोहळ

लिहीण्यासाठी काय हवे

लिहीण्यासाठी काय हवे
हवे कागद अन् लेखणी

तरी लिहिता येईल का त्यावरी
हजार पानी ती कादंबरी

विचारांशिवाय उमटेल का त्यावरी
निदान एक तरी चारोळी 

कितीही असो शाईने भरलेली लेखणी
कागदांवरी उमटेल का कवितांची लेणी

कागदांमागून कागद भरले
लेखणीने सारे काळेनिळे कोरले

विचारांशिवाय  उमटतील का शब्द
रकान्यांमागून रकाने राहतील निशब्द

असूनही कागद अन् लेखणी 
विचारांशिवाय राहतील कोरेच्या कोरे

केऱ्या मनात उमटतील विचार नवे
तेव्हाच होतील कागद शब्दालंकाराचे लेणे

आयुष्याची संध्याकाळ

 ये आयुष्याची संध्याकाळ 
आठवात येई निज काळ

घडून गेले जे भले बुरे
उभे राही स्वच्छ डोळ्यांपूढे

घडल्या असतील चुका अनेक
पण नीयत होती नेहमीच नेक

येवून गेले कितीएक जीवनात
लावून गेले माया जिव्हाळा मनी

तिन्ही सांजेला संध्या समयी
संदीप्रकाशी दिसतो जीवन प्रवास 

हरवले गवसले जे जे ऐसे
खंत खेद अन् आनंद मनी न मावे 

दिसतो मजला पैलतीर आता
न भिवती मज संध्याछाया आता