Thursday, July 31, 2025

पैसा

कोणी तरी म्हणालं की, घरात कायम ५ हजार रुपये पाहिजे केव्हा गरज लागेल सांगता येत नाही. खरच गरजेला पैसा कामाला येतो. पण तो किती पुरेसा आहे ह्याच मापदंड कसं ठरवणार. 


खरचं गरजेला पैशाचा उपयोग होतो? एखाद्याकडे घरात पाचपन्नास हजार रुपये कपाटात पडून असतील तर त्याचा जीव खरचं वाचू शकतो का? फक्त एक कार्डिआक ॲटॅक सर्व खेळ खलास. ते पाच पन्नास हजार कपाटात तसेच पडून राहतात. काही लोकांच्या नशिबात व्हिल चेअरवर, अंथरूणास खिळून राहण्याची वेळ येते. पैसा आहे म्हणून त्याला बरं होता येत नाही. पैशामुळे त्याच्या दिमतीला सकाळ, दुपार, संध्याकाळ तीन-तीन माणसं पगारी ठेवतां येतील. पण, त्या माणसाला धड बोलताही येत नाही अन् जीव जात नाही म्हणून मरताही येत नाही. मग मला सांगा कितीही पैसा असला तरी उपयोग काय?


खरचं पैसा हा लागतोच  पण, किती? हा ज्याचा त्याच प्रश्र्न कारण, तो कितीही असला तरी कमीच पडतो आणि नसला तरी काही फरक पडत नाही. पैसा असला तरी जीव काही वाचत नाही अन् नसला तरी जात नाही.


कालच मंडई जवळ एक प्रेत बघितलं. अगदी मुन्नाभाई MBBS मधल्या डिसेश्कनला घेतलेल्या प्रेतासारखं. हाडांची काडं झालेली. कित्येक दिवस उपाशी राहील्याने पोट खपाटीला गेलेलं. कित्येक महिने अंगाला पाणी न लागलेल. रापलेलं शरिर. केस, दाढी अस्ताव्यस्त वाढलेलं.डोळे आकाशाकडे लागलेले सताड उघडे. असं बेवारस भयानक मरण माणसाच्या वाट्याला का यावं? याचं उत्तर न माझ्या-तुमच्याकडे, ना त्या विधात्याकडे.


मग प्रश्र्न असा पडतो की जगण्यापूरता का होईना थोडा पैसा माझ्याकडे आहे. पण, ज्याला रोजच्या एकावेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यानं काय करावे? त्याला आपण का जगतो हा प्रश्र्न नेहमीच पडावां आणि आपल्याकडे असणाऱ्या कमतरतेवर खंत करावी. पण असे फुटपाथवर भिक मागत जगणारे असंख्य जीव बघितले की जीव तुटतो. अशा लोकांसाठी आपण काही करू शकत नाही तर आपल्याला काय अधिकार आहे असलेला पैसा उधळायचा. निदान मला इतरांसाठी काही करता आलं नाही तरी रोजचा घास खाताना क्षणभर तरी माझा घास अडला तरी खूप. मी कोणाचं पोट भरावं इतका मोठा नक्कीच नाही. पण जगात असंख्य जीव उपाशी असताना मला रोज मिळणाऱ्या घासाची मला किंमत कळावी इतकेच. मी कोणाचं कायमचं पोट भरू शकलो नाही तरी कधी कुणा भुकेल्याला चार घास खाऊ घालू शकलो तरी माझी त्या इश्वरचरणी थोडी सेवा होईल. शेवटचा श्र्वास घेताना त्या विधात्याचा नजरेला नजर देण्याची हिंम्मत होईल. मी लिहिलेल्या अनेक माणूसकीच्या कविता ‘माणूसकीने’ जगल्याचं थोड समाधान मिळेल इतकचं.


....सुनील

Sunday, July 13, 2025

दशावतार स्तोत्र

दशावतार स्तोत्र

हे गणनायका गजानना प्रथम तुज वंदितो।
हे पार्वतीनंदना बुद्धीदाता कृपा मजवरी करावी।।१।।

हे सरस्वती विद्यादायीनी लेखणीत माझ्या विसावी ।
तुच घडवी स्तोत्ररचना मजकरवी॥२॥

आता वंदू गुरूराया स्वामी सत्यव्रततीर्था।
जयांचे आम्ही असू वंशज आभिमान सार्थ॥३॥

जयांनी घेतलीसे सांगलीस संजीवन समाधी कृष्णाकाठी
कृष्णातीरी असे ते मूलवृंदावन विष्णु घाटी॥४॥

मध्वपरंपरेचे जे असती श्री उत्तरादी मठाधीश।
जे देतील मजकारणे नित्य आशीश॥५॥

वेदतत्वाचे करूनी मंथन अर्थ सांगती विद्वजना।
इष्ट प्रदान  करती  भक्तजना॥६॥

स्वामी सत्यव्रततीर्थ असती कल्पवृक्ष।
जयांचे करतो मी दिनरात स्मरण॥७॥

मी पापी पामर काय वर्णू लीला तुझ्या दिनानाथा।
भक्ताकारणे धरिलेसी अनेक अवतार दिनानाथा॥८॥

वर्णन करण्या तुझी महती जिव्हा माझी थोटकी।
कायासी करावे मी यत्न ते फूकाफूकी॥९॥

सत्यव्रत मनुराजासी तुवा दिले वरदान।
प्रलयकाळी  वेद अन् जीवांचे करण्या रक्षण॥१०॥

तुवा धरीले ते मस्यरूप हे श्रीहरी।
चराचर सृष्टीचे केलेस रक्षण सत्ययुगी॥११॥

देव आणि दानवा केले  क्षीर सागर मंथन।
मंथनासी केली रवी पर्वत मंदार॥१२॥

सागरी स्थिर राहेना तो पर्वत मंथनी।
बुडू लागलासे तो पर्वत सागरी॥१३॥

देव दानवांच्या मदतीस धावून आला दिनानाथा।
कूर्मरूप करून धारण दिला आधार पर्वता तू दिनानाथा॥१४॥

काय वर्णू तुझी महती लेखणी माझी थिटी।
बा अनंता तुझ्या लिला अनंत असती॥१५॥

हिरण्याक्षे घेतला धरेचा ताबा गेला घेऊनी रसातळा।
करण्या पृथ्वीचा उद्धार हा हरी वरहरूपी अवतरला॥१६॥

हिरण्यकश्यपू करी राज्य आपूले त्रिभूवनी।
देवतांसी तो अजिंक्य ठरलासी॥१७॥

त्यासी ब्रम्हदेवे दिधले अमरपणाचे वरदान ।
तुवा वधीला तो असुर धरूनी रुप नरसिंह ॥१८॥

असूरांचा राजा बली करी देवतांसी परास्त।
प्रह्लादाचा तो वंशज तुवा उद्धारीला ॥१९॥

केलेसी पादाक्रांत धरूनीया वामनरूप लोक तिन्ही।
वधीला न तू आसूर ठेवूनी मस्तकी पाय लोटला पातळी॥

भृगुकुळात घेतलासी परशूराम रूपे अवतार।
क्षत्रिय मातले अतोनात तु केलासी संहार॥२१॥

अजिंक्य होती देवतांसी ते असूर।
जाहलासे धरेवर तयांचा भार॥२२॥

त्रेतायुगी घेतलासे श्रीहरींनी अवतार।
दशरथनंदन मर्यादा पुरूषोत्म श्रीराम॥२३॥

कौशल्यानंदन सीतापती रघुरायांनी
स्थापियले रामराज्य, असूर रावण वधुनी॥२४॥

द्वापार युगी वाढली ती असूरवृत्ती मानवांत।
पापांमुळे जाहली पृथ्वी दयनीय॥२५॥

श्रीकृष्ण रूपे घेऊनी पूर्णावतार धर्म स्थपाना केलीस।
युगेयुगे धर्म रक्षणासी अवतार घेईन दिधले तु वचन॥२६॥

कलियुगात मानवात वाढे कर्मकांड।
वेदांपासून जाहले दूर ते दानव॥२७॥

तुवा त्यांसी करून मोहीत बौद्ध रूपे ।
केलासी तू दानवांचा तो उद्धार॥२८॥

कलियुगात होईल सभ्यता अन् संस्कृती ही ध्वस्त।
घेईल हरी स्थापण्या धर्म कल्कीरूपे अवतार॥२९॥

शके १९४७ मंगळवार आषाढ शुद्ध त्रयोदशीस ।
ब्रह्ममुहूर्ती झाले साकार हे स्तोत्र॥३०॥

जळी स्थळी पाषाणी दिसे मज तव रूप।
डोळा झाकतां उघडता दिसे तव नरसिंहरूप॥३१॥

स्वप्नी दिले तुवा दर्शन जाहलो मी कृतार्थ ।
आता न राहिली मज चिंता कशाची दिनानाथ ॥३२॥

तु निर्गुण निराकार भक्तासाठी सगुण साकार होसी।
जे जे करती तुझी निज भक्ती त्यासी देसी अनुभूती॥३३॥

शके १९४७ बुधवार आषाढ शुद्ध चर्तुदशीस तिन्ही सांजे।
जाहले हे दशावतार स्तोत्र सुफळ संपूर्ण ॥३४॥

तुज नित्य वंदीतो हा पामर सुनील।
असू द्यावे नित्य या भक्तावर कृपेची पाखर॥३५॥

….स्वामी खडकानंद

पंढरीची वारी

आम्ही केली दर वर्षी पंढरीची वारी
आम्ही केला मुक्काम हरी विठ्ठलाच्या घरी

माझ्या माय माऊलीचे माहेर ते पंढरी
तिथे नांदे तिची मायमाऊली बंधू सखा नी सखी

नित्य होतसे आमुचे तेथे जाणे येणे
परी कधी न कळले न वळले पंढरीचे महिमान

आम्ही जरी होतो हरी भक्तीचे अजाणते
विठुचरणी ठेवियेला माथा येता जाता

कळला नाही पंढरीच्या वारीचा महीमा
तरी कधी चुकली नाही पंढरीची वारी

हरी विठ्ठलच असे आमुचा मामा
त्याचे प्रेमा नाही काही उपमा

चंद्रभागेमजी केले स्नान ते नित्य
तेथेची भक्त पुंडलिकाचे जाहले दर्शन नित्य

विटेवरी केला उभा हरी
आम्हासाठी तो भक्त पुंडलिके

घडलीसे अनायास पंढरीची वारी
आता न राहिला पंढरीस विठ्ठल हरी

आता नाही जाणे येणे आमुचे
पुन्हा नाही पंढरीस परतुन येणे

घेतलासे आता निरोप पंढरीचा विठ्ठल हरि
परतलासे वैकुंठी आता विठ्ठल हरि

… हरी भक्त सुनील

विसरू कैसे तुला विठूराया

विसरू कैसे तुला विठूराया
मंदिर तव येतसे तिन्ही त्रिकाळ

विसरू कैसे तुला विठूराया
जाता येता तव चरणी ठेवीला माथा

विसरू कैसे तुला विठूराया
खेळ खेळलो सभामंडपी तुझ्या

विसरू कैसे तुला विठूराया
कळसावरी खेळलो लपाछपी

विसरू कैसे तुला विठूराया
गरूड खांबा घातलीया मिठी

विसरू कैसे तुला विठूराया
माझ्या मायेचे आजोळ पंढरपूर

विसरू कैसे तुला विठूराया
देखियेले तुज प्रत्यक्ष डोळा

विसरू कैसे तुला विठूराया
आठवात येती ते दिन सारे

विसरू कैसे तुला विठूराया
या भक्ता विसरू नको देवराया

विसरेल कैसे तुला विठूराया
तव चरणी लीन तो सुनील 

कायासी करू आम्ही पंढरीची वारी

आम्ही कधीच म्हणत नाही करू पुढच्या वर्षी वारी
आम्ही जन्मोजन्मी करतो भूलोकीची वारी

कधी मनुष्य, कधी प्राणी, कधी फुले झाड वेली
पण आमची कधीच चुकत नाही भूलोकीची वारी

कधीच नाही म्हणत ‘राम कृष्ण हरी’
तरी चुकत नाही भूलोकीची वारी

करू आम्ही मातपितरांची सेवा
पुंडलिकाप्रमाणे करू हरी विटेवर उभा

आम्ही कधीच म्हणत नाही करू पुढच्या वर्षी वारी
आम्ही जन्मोजन्मी करतो भूलोकीची वारी

हरीच करेल आम्हीसाठी युगे युगे भूलोकीची वारी
कायासी करू आम्ही पंढरीची वारी
 

सुशांताही आज शांत जाहली

आज एक शब्द निःशब्द जाहला
एक लेखणी विसावली

आता न कधी मिळतील कुणा
खास दिनी शब्द फुलांच्या माळा

जीची गात होती शब्द गाणी जीच्या शब्दात होते भाव सारे
जीवनाचा कळण्या अर्थ शब्दांस घालील आता कोण साद

ती एक फूलवेडी कळी आज कोमेजली
चाफ्याचा सुगंध आता दरवेळल कायासी

नामकरण वाढदिवस शुभविवाहाच्या शुभेच्छा
आता फक्त आठवणींचा उमाळा

इंद्रधनुचे रंग जाहले आज फिके
डोळ्यात येई मग आसवांची पिके

भास्कराचा अस्त जाहला 
सुशांताही आज शांत जाहली

श्रीमती सुशांता भास्कर देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो 

…. सुनील (1 JULY 2025)

… तेरी कविता की राह में सुनील

तरे अंदर वो छुपी बैठी है
कबसे तुझे पुकार रही है

दिलमें तेरे समा गयी है 
तडप रही है बाहर आने

मॉंग रही है अस्तित्व तेरा
चाह रही है जीवन तेरा

पुकार पुकार कर कह रही है
मुझको कोई अपना हाथ दो 

इस कुअेसे मुझको निकाल दो
मुझको कोई अपना साथ दो

कह रही है वो तुमको
भुल गये हो तुम मुझको

खो गये हो न जाने कहॉं तुम
देख न रहे हो मेरी ओर तुम

मुझसे दूर तुम जा चुके हो
मुझसे मुहॅं तुम मोड चुके हो

मुझको मेरा तुम रुप दो
मुझको मेरा तुम गीत दो

मुझको मेरा तुम संगीत दो
मुझको मेरा तुम स्वर दो

हे स्वानंद जागे की कब ये तेरी कला
बरसों से जो सोयी है न जानें कहॉं खोयी है

… तेरी कविता की राह में सुनील