Sunday, April 12, 2020

पण, त्यांचे काय?

तुम्ही आम्ही चार भिंतीत राहू सुरक्षित
पण, त्यांचे काय? ज्यांना क्षितीजाच्या भिंती अन् आभाळाचं छत

महिन्या दो महिन्याचं आपण भरून ठेवू रेशन
मग कितीही का वाढेना लाॅकडाऊनचे सेशन

सांगा पण गरिबांनी ते करावे काय
दात कोरन तरी भरतील का पोटं

पण अशी रोज रोज भरायला पोटं
दातांमध्ये तरी राहिलाय का अन्नाचा कण

आता दातांमधल्या किटाणूंची होत आहे उपासमार
कारण दातावरही मारायला उरला नाही अन्नाचा कण

तुम्ही आम्ही चार भिंतीत राहू सुरक्षित
पण, त्याचे काय? ज्यांना क्षितीजाच्या भिंती अन् आभाळाचं छत

कोण कुठला व्हायरस कोरोना...

काम, काम अन् काम नुसते काम
करतो आहे गेले पंधरा दिवस काम

काम, काम आहे भरपूर काम
पण माहित नाही त्याचा मिळणार कधी दाम

करून करून इतके अपार कष्ट
कुणास ठाऊक होईल का लक्ष्मी संतुष्ट

‘लाॅकडाऊन’च्या या जमान्यात थांबले रहाटगाडगे
पण भरायचे राहिल का हे पोटाचे खळगे

‘लाॅकडाऊन’ नंतर म्हणत, ‘पुन:श्र्च हरीॐ’
ऊभे राहू सारे जिद्दीनं

कोण कुठला व्हायरस कोरोना
हा आपल्या आधी का जन्मला

काल परवा अवतरलेला एवढासा जीव
सर्वांचा लागला आहे टांगणीला जीव

घरामध्येच राहू अन् सोशल डिस्टसिंग पाळू
मिळून सारेजण ह्या दैत्या पळवून लावू

कोरोनाचा हा खेळ....

घरा बैसोनिया सारे जन
वेळ हा कैसा जाता जाईना

कोणी पाही रामायण-महाभारत
कोणी लावी हा चित्रपट

कोणासी केवळ मनी मानसी चिंतन
तरी हा वेळ हा जाईना निरंतर

कोरोनाचा हा खेळ चाले जगभर
थांबले हे जग क्षणभर

सुनील म्हणे हे पाहवे ना डोळा
आता तरा तुज येवो दयाघना

नाडले हे जन जन सारे
तुजवीण अनंता कोण धावे

धाव धाव आता रे भगवंता
दूर करी हे संकट अनंता

मानवाविना सृष्टि

सृष्टिची अशी ही कल्पना
कशी करू तुझ्याविना मानवा

 असेल जरी येथे हे चराचर सारे
पण जर नसता तू व्यर्थ ते सारे

असतील येथे वृक्षवल्ली जरी
नसेल येथे तुजविण चैतन्य तरी

असताही येथे प्राणीजात अनेक
वाटेल तरी ही धरा कळाहीन

फिरुनी लक्ष चौऱ्यांशी योनी
अस्तित्वात येशी तू मानवरूपी

तरी दाखवशी माज ऐसा
ही सृष्टि माझी आहे दास ऐसा

तुजवीणही ती राहील रे अबाधित
नको समजूस तू स्वत:स भगवंत

‘जनता कर्फ्यू’

आज प्रथमच शहरांत आहे शांतता नीरव
दुकाने बंद, घरात सारे बंद, रस्ते सुनसान

कुत्र सुद्धा नाही म्हणतां रस्त्यांवर कुत्रीच फिरताहेत
निर्मनुष्य रस्त्यावर आहे चिटपाखरांचाच वावर

‘जनता कर्फ्यू’चे पालन करताहेत जन जे जागरूक
देशाचे आहेत हेच खरे आदर्श नागरिक

आता वाटते असे की, महिन्यातून एक दिवस
नेहमीच करावा साजरा ‘जनता कर्फ्यू’

आम्ही असावें कैसे

आम्ही असावें कैसे
ठेविले अनंते तैसे

न कशाचा धरावा मोह
चित्ती ते धरावे समाधान

सदैव वाहत असे ते नाक
सदा कोंडत असे तो श्वास

परी औषधी न ये कामास
भोग ते भोगणे विना सायास

आपुले आपण करावे ते कर्म
न धरावी फळाची आशा व्यर्थ

होईल तेची खरे जी इश्वरेच्छा
आपण न करावी कामेच्छा

जे जे होईल ते इष्ट
ते ते मानावे संतुष्ट

भार सारा, भिस्त सारी ती एक भगवंत
माझे हितअहीत पाहिल तो एक भगवंत

आता न आशा कशाची
न आता चिंता कशाची

असतां सदैव तो माझा पाठीराखा
’हाऊ आर यु’ ते सांगेल सखा