Saturday, August 10, 2019

आर्शिवाद ईच्छुक

खडकालाही कधी कधी पाझर फुटतो
लोकांना तो जिवंत झरा वाटतो

त्या पाण्याची ती अविट गोडी
भल्या भल्यांची तहान भागवी

मायेचा हा झरा वाहता अटेल ना कधीही
थांबला जरी पाऊस पाणी

भरभरून घ्याव्या घागरीवर घागरी साऱ्या
भर त्या ओहळाचा अटेल ना न्यारा

दूरूनही हा मायेचा पाझर ओला
करत राहील सर्वांना चिंब ओला

स्पर्श जरी आता दृश्य हातांचा झाला नाही डोईवरी
अदृश्य स्पर्श आर्शिवादाचा राहील सदैव डोईवरी

आर्शिवाद ईच्छुक
... सुनील
(.... सासूबाई सौ. चित्रा यार्दी यांच्या निधनानंतर लिहिलेली कविता (१३ जुलै २०१९))

No comments:

Post a Comment