आपलेच शब्द जेव्हा होतात आपल्यालाच अनोळखी
तेव्हा आपल्याच भावना. होतात आपल्यालाच अनोळखी
ओळखीचीच नाती जेव्हा अनोळखी होतात
नात्यामधली अंतर ही
तेव्हा वाढत जातात
हरवलेले शब्दही सापडत नाही परत
दूरावलेली नातीही जूळत नाही परत
मग मात्र सारे जगच होतं अनोळखी
आणि स्वत:च स्वत:ला होत जातो अनोळखी
हि हरवलेली स्वत:चीच ओळख
कुठल्याही शब्दांमधून परत नाही मिळत
No comments:
Post a Comment